दुर्घटना
पहिली इमारत कोसळली...अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला...दुसरी इमारत कोसळली...लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न पुढे केला गेला...इमारती कोसळताहेत.....पण साप साप म्हणत भुई थोपटण्याचा प्रकार सुरु आहे...आपणच वाढवलेलं पाप असं उरावर बसेल, हे कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं...पण अति तेथे माती, हा निसर्गाचा नियम आहे...जी चूक मानवाने स्वतः निस्तरायला हवी होती, ती निसर्गाने स्वतःच्या हातात घेतली ...आता आणखी एक इमारत कोसळलीय...पुन्हा चर्चा...पुन्हा आश्वासने...पुन्हा आजचा सवाल...रोखठोक...तेच प्रश्न..तेच चेहरे..तीच उत्तरे...वारंवार घडणाऱ्या घटनेने अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावरून राजकीय भूकंप होऊ शकतो, हे लक्षात घेऊन, आता संबंधित क्षेत्र भूकंप प्रवण आहे का, याच्या तपासाची मागणी करून पुन्हा मूळ समस्येला बगल देण्याचा प्रयत्न सुरु आहे. राजकारण करण्यासाठी गेंड्याची कातडी असावी लागते म्हणतात, ते उगाच नाही...!!!
जखमींना एक लाख,
मृतांना दोन !!
हि मानवी जीवांची किंमत
कि तात्पुरता दिलासा देणारा दृष्टीकोन ?
सरकारचे जातात काही लाख,
पण लाखमोलाचे संसार होतात बेचिराख...
प्रत्येक आपत्तीत
सरकार देते उपाययोजनांची हमी,
प्रत्येक वेळी सरकारची
साधनसामुग्री पडते कमी...
आपलं कोणी जाईपर्यंत,
गेल्या जीवांची किंमत
आपल्यालाही कळत नसते,
आपणही असतो समजून उमजून,
कळूनही वळत नसते,
फक्त दोनचार दिवस
संकटांचे विषय गाजतात,
उध्वस्त जीवांच्या आक्रोशाने
बातम्यांचे स्टुडीओ सजतात,
घटना घडत राहतात,
चर्चा झडत राहतात,
लोकहि जातात विसरून
काय काय घडून गेलंय,
सरकारच्याही आता
सारे अंगवळणी पडून गेलंय...
सरकारचे जातात काही लाख,
पण लाखमोलाचे संसार होतात बेचिराख...
पहिली इमारत कोसळली...अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला...दुसरी इमारत कोसळली...लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न पुढे केला गेला...इमारती कोसळताहेत.....पण साप साप म्हणत भुई थोपटण्याचा प्रकार सुरु आहे...आपणच वाढवलेलं पाप असं उरावर बसेल, हे कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं...पण अति तेथे माती, हा निसर्गाचा नियम आहे...जी चूक मानवाने स्वतः निस्तरायला हवी होती, ती निसर्गाने स्वतःच्या हातात घेतली ...आता आणखी एक इमारत कोसळलीय...पुन्हा चर्चा...पुन्हा आश्वासने...पुन्हा आजचा सवाल...रोखठोक...तेच प्रश्न..तेच चेहरे..तीच उत्तरे...वारंवार घडणाऱ्या घटनेने अनधिकृत बांधकामांच्या मुद्यावरून राजकीय भूकंप होऊ शकतो, हे लक्षात घेऊन, आता संबंधित क्षेत्र भूकंप प्रवण आहे का, याच्या तपासाची मागणी करून पुन्हा मूळ समस्येला बगल देण्याचा प्रयत्न सुरु आहे. राजकारण करण्यासाठी गेंड्याची कातडी असावी लागते म्हणतात, ते उगाच नाही...!!!
जखमींना एक लाख,
मृतांना दोन !!
हि मानवी जीवांची किंमत
कि तात्पुरता दिलासा देणारा दृष्टीकोन ?
सरकारचे जातात काही लाख,
पण लाखमोलाचे संसार होतात बेचिराख...
प्रत्येक आपत्तीत
सरकार देते उपाययोजनांची हमी,
प्रत्येक वेळी सरकारची
साधनसामुग्री पडते कमी...
आपलं कोणी जाईपर्यंत,
गेल्या जीवांची किंमत
आपल्यालाही कळत नसते,
आपणही असतो समजून उमजून,
कळूनही वळत नसते,
फक्त दोनचार दिवस
संकटांचे विषय गाजतात,
उध्वस्त जीवांच्या आक्रोशाने
बातम्यांचे स्टुडीओ सजतात,
घटना घडत राहतात,
चर्चा झडत राहतात,
लोकहि जातात विसरून
काय काय घडून गेलंय,
सरकारच्याही आता
सारे अंगवळणी पडून गेलंय...
सरकारचे जातात काही लाख,
पण लाखमोलाचे संसार होतात बेचिराख...