कायदा नेमका कशासाठी असतो....गुन्हे रोखण्यासाठी कि गुन्हे घडल्यावर गुन्हेगारांना फक्त शिक्षा व्हावी म्हणून.....? मध्यंतरी भरून हत्येच्या घटनांनी संपूर्ण देश ढवळून निघाला होता. तेंव्हा आपण सारे म्हणालो होतो, अश्या गुन्ह्यांसाठी कडक कायदा हवा....भ्रष्टाचाराविरोधात तर एक नवी स्वातंत्र्य लढाईच सुरु झाली होती....तेंव्हाही आपण म्हणालो होतो, भ्रष्टाचाराविरोधात कडक कायदा हवा...महाराष्ट्रात मधल्या काळात दरोडे सत्र सुरु होतं , दरोडेखोर सरळ नागरिकांवर जीवघेणे हल्ले करत होते...देवांनाही त्यांनी सोडले नाही...तेंव्हा आपण त्यांना धडा शिकवणार होतो...वृद्धांची हत्या झाली कि देशभर वृद्धांच्या सुरक्षेवर चर्चा होते...शाळांच्या बसेसना मोठा अपघात झाला कि सगळ्या वाहिन्यांवर तोच विषय....आता देशभर बलात्काराच्या घटनांवर चर्चा सुरु आहे. आपण पुन्हा म्हणालो, बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कडक कायदा हवा...प्रत्येकवेळी आपण नव्या कायद्यांची मागणी करतो...आणि त्या त्या वेळी असं वातावरण पेटलेलं असतं कि फाशीशिवाय आपल्याला काही सुचतच नाही....गुन्हा घडल्यावर फिर्यादीला मजबुतीने उभं राहावं लागतं , आपली बाजू मजबुतीने मांडावी लागते, पुराव्यांसाठी पोलिसांना संयम राखून सहकार्य करावं लागतं , नागरिकांनी साक्षीदार म्हणून पुढे येणं तर अधिक महत्वाचं आहे, ( जे अभावाने घडतं ) न्यायालयासमोर गुन्हा सिद्ध झाला तरच शिक्षा सुनावली जाते, याचे भानच कोणी ठेवत नाही....फक्त स्वतापुरता स्वताभोवती कोष करून जगणार्यांच्या समाजात कायद्यातील कठोर तरतुदी सुद्धा कुचकामी ठरतात. वास्तविक जागरूक समाजात गुन्ह्याचं प्रमाण कमी होऊ शकतो. असा प्रयत्न आपण का नाही करत...कायदा हि केवळ एक सहाय्यभूत व्यवस्था असायला हवी. पण घडतं उलटंच ....आपण सारे काही कायदा स्थापित यंत्रणेवर सोपवून नामानिराळे राहतो....मग प्रश्न पडतो, खरंच कायदा नेमका कशासाठी असतो....गुन्हे रोखण्यासाठी कि गुन्हे घडल्यावर गुन्हेगारांना फक्त शिक्षा व्हावी म्हणून.....?
No comments:
Post a Comment