*सण,उत्सवांना आलेलं विकृत स्वरूप मतांसाठीच्या राजकारणातून आलेलं आहे, त्यामुळे ते टिकवून ठेवण्यासाठी राजकारणी धडपडणारच !!!*
त्यांच्यामागे लागून आपण सण, उत्सवातला निखळ आनंद, बंधुभाव, संस्कृती गमावून बसायचं काय, हे जनतेने ठरवायला हवं.
*सजवलेल्या रश्शीवरून दहीहंडी क्रेनला लटकू लागली,*
*ढोलताशांची जागा कर्कश्य डीजेंनी घेतली,*
*पारंपरिक गीतसंगीताची जागा अचकटविचकट गाण्यांनी घेतली,*
*गोविंदा रे गोपाळा च्या जागी शांताबाई आली,*
*धार्मिक भावना, श्रध्दांचा लीलावी बाजार झाला,*
*उत्सवाच्या जागी उन्माद आला,*
*सणाचा जीवघेणा खेळ झाला,*
थर वाढत चालले आणि लहानग्यांचे जीव पणाला लावण्याइतपत राजकारणाचे थर खाली आले,
*तरी कसल्या परंपरेच्या बाता मारताेय आपण ?*
सर्वसामान्यांचं जीणं हराम करणारा, दैनंदिन जनजीवन विस्कळीत करणारा, वृध्द, बालके, रूग्ण यांना होणाऱ्या त्रासाची पर्वा न करणारा उत्सव, कोणत्याही जातीधर्माचा असो, त्यातला उन्माद मोडून काढायची जबाबदारी सर्वप्रथम सरकारची असते. सरकार अपयशी ठरलं, तर न्यायालय नाक खुपसणारच !!!
गोहत्याबंदी किंवा शहाबानो प्रकरणात आपण कोणीच असे म्हटले नव्हते, की न्यायालय नाक खुपसतंय !!!
न्यायालयाचे निर्णय म्हणजे स्वार्थासाठी ठेकेदारांच्या हितार्थ घेतलेले महापालिकांतील स्थायी समितीचे निर्णय वाटतात की काय राजकीय पक्षांना ?
सण,उत्सवांच्या आड इथली संविधानिक व्यवस्था मोडीत काढून धर्मव्यवस्थेला देशापेक्षा वरचढ ठरवायचा डाव, आपण जातपातधर्मभाषाप्रांत भेद विसरून हाणून पाडायलाच हवा. *अन्यथा बंद करा १५ ऑगस्ट नि २६ जानेवारीला तिरंग्यांचे प्रोफाईल फोटो लावणं !!!*
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची जर देशात खुली अवमानना व्हायला लागली, तर देशात अराजक यायला वेळ लागणार नाही. *ही अराजकता भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाही !!!*
*विरोध उत्सवाला आणि त्यातल्या उत्साहाला नाही, उन्मादाला आहे, हे लक्षात घ्या.*
*राज असरोंडकर*
कायद्याने वागा लोकचळवळ
No comments:
Post a Comment